Posts

कोकणातली भात लावणी ।। kokan Farming

Image
कोकणामध्ये भात लावणी सहजा जुन आणि जुलै महिन्यात केली जाते. जर पाऊस जास्त असेल तर कोकणातील लोक भात लावणीला सुरवात करतात . भात लावणी करण्यासाठी जिथे लावणी होणार आहे त्या भागात पाणी सोडून त्यावर नांगर धरला जातो आणि जमीन भुसभुशीत केली जाते. जमीन संपूर्ण पणे भुसभुशीत होणे म्हणजे संपूर्ण जमिनीत चिखल केला जातो .त्यानंतर आपण जी पेरणी केलेली असते तिथे रोप  आलेली असतात . ती रोप उपटून आपण त्याचे मूठ तयार करायचे आणि ज्या भागामध्ये चिखल  केलेला असतो तिथे सर्व रोपे थोड थोड अंतर ठेवून आपण भात  लावणी करतो.त्यामुळे आपल्याला जास्त उत्पादन मिळते.अशाप्रकारे कोकणामध्ये पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीने शेती केली जाते .संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भात  लावणी केली जाते.       

गावाकडचे खेळ आणि आठवणी

Image
पंधरा वर्षांपूर्वी गावाकडे खूप खेळ खेळे जात असत. पण आता काही वर्षा मध्ये ते खेळ दिसत सुद्धा नाही आहेत. जर  आता आपण कुणाला विचारल आम्ही त्यावेळी  खूप खेळ खेळायचो त्यावेळी आम्ही चांगले चांगले खेळ खेळत  असायचो. पण ज्यांनी खेळ बघितलेच नाही ते विश्वास कसे ठेवणार.मी लहान  असताना खूप खेळ खेळायचो. उदा  लगोरशी,विटीदांडू ,गोट्या ,क्रिकेट ,कब्बडी ,लपाशपी,करवंटी आपसेस,खोखो,थाळीफेक,गोळाफेक,लांबउडी ,लंगडी पत्ते ,चोर पोलीस ,आबाधोभी ,इत्यादी  खेळ मी लहानपणी खेळे होते . माझा सर्वात आवडता खेळ क्रिकेट होता. तसेच खोखो आणि कब्बडी या खेळात मला खूप बक्षीस सुद्धा मिळालेली .  गावाकडे खूप प्रकारचे खेळ खेळायला भेटतात. गावाकडची मोकळी मैदाने मोकळी हवा त्यामध्ये खेळ खेळण्याची वेगळीच मजा असते . पूर्वी गावमधली सर्व मुले मंदिरात येऊन खेळ खेळत असायची काही जण लपाछपी तर काही चोरपोलीस . कब्बडी असे ज्याचा त्याच्या आवडीनुसार खेळ खेळायचे पण आता ते खेळ आपल्याला खेळायला भेटत नाही. कारण लोकसंख्या वाढली माणसांचे विचार बदलले. माणुसकी संपली त्यामुळे राहिल्या त्या फक्त आठवणी . मी  लहान असताना आमची वेळ ठरलेली असायची कि सकाळ

कोकणची लालपरी

Image
कोकणच्या लालपरीने केलेला प्रवास  प्रत्येकाच्या जीवनातला प्रवास हा एसटीने होत असतो. कोकणामध्ये तिला कोकणची लालपरी  असे म्हटले जाते. गावापासून ते मुंबईपर्यँत आपण सर्व एसटीने  प्रवास करतो. गणपती मध्ये मोठ्या प्रमाणात गावी जाण्यासाठी एसटींची बुकिंग केली जाते. मुबई मधून मोठ्या प्रमाणात कोकणची लाल परी कोकणाकडे रवाना होतात . मुंबई मध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांच्या घरी सुखरूप पणे पोचवतात. तुम्ही कोकणामध्ये गेलात तर तुम्हाला सर्व ठिकाणी कोकणच्या लालपऱ्या पाहायला मिळतील. गावाकडे कुठेही कोणत्याही ठिकाणी तुम्हाला जायचं असेल तर लालपरीनेच प्रवास करावा लागतो. आपल्या आयष्यातील सर्वात मोठा वाट म्हणजे कोकणची लालपरी म्हणून ती खूप लोकप्रिय आहे . आपल्या प्रवासात आपल्याला सांभाळून घेऊन जाणारी आपली लालपरी आहे. गावाकडे शाळेत जाण्यासाठी दररोज सकाळी ९ वाजता शाळेत जाण्यासाठी एसटी यायची तसेच कॉलेजच्या मुलांना त्या वेळेत कॉलेज मध्ये घेऊन जात असे . अशा प्रकारे कॉलेज सुटल्यावर पण मुलांना घरी जाण्यासाठी एसटी असायची. कोकणामध्ये कुटलाही सण असला तरी मुंबई  मधून गावी जाण्यासाठी  एसटी असायची. गावाकडून ते मुंबई पर्य

शाळेतील दिवस... काही आठवणी...शालेय जीवनातील गमतीजमती ..

Image
शाळा आणि शाळेतील दिवस प्रत्येकाच्या जीवनातील अगदी जवळच नात आहे. प्रत्येकाच्या जीवनाची  पहिली पायरी म्हणजे शाळा.शाळेतून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतात. मी जेव्हा शाळेमध्ये जायचो तेव्हा शाळेमध्ये खूप मस्ती करायचो. मित्रां सोबत मस्ती करायला भेटायची. कुणाला काहीतरीचिडवणे त्याच्या पाठीमागून डोक्यात मारणे खूप माझ्या  ही आमची दररोजची मजा असायची.शाळेत असताना सरांनी आम्हाला खूप मारलेल अजून  आम्ही विसरलो नाही आहे. शाळेमध्ये असताना आम्ही कब्बडी ,खोखो,क्रिकेट ,विटीदांडू ,थाळीफेक,लांबवुडी, गोळाफेक,धावण्याच्या  स्पर्धा  लावत असो.कधी चुकून शाळेत असणारे मित्र वाटेत अचानक भेटतात आणि एकमेकांबदल विचारपूस करतात. त्यामध्ये काही शाळेतील काही गोष्टींची आठवण येते. काही चांगले प्रसंग आठवतात.शाळेतले काही काही शिक्षक खूप चांगले असायचे. शाळेमध्ये लेट  गेलो तरी काही बोलायचे नाही. काही तर मारायचे पण आणि वर्गाच्या बाहेर बसवून ठेवायचे. अभ्यास नाही केला तर मार पण खायचे वर्गाच्या बाहेर वणवा उभे करायचे. आणि परत  दुसऱ्या दिवशी पालकांना घेऊन यायचं. मग घरी गेल्यावर परत मार खायचे. अशा होत्या शाळेतील आठवणी.तसेच श

कोकणच्या काजू

Image
एप्रिल आणि मे ह्या महिन्यात काजूंचा हंगाम असतो. कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात काजू पाहायला मिळतात. काही ठिकाणी तर काजूंची लागवड केली जाते. मार्च एप्रिल या महिन्यात काजुना  तोरण येते . काजूंचा उपयोग खूप ठिकाणी केला जातो. ओल्या काजूनपासून  भाजी तयार करता येते. आपण सुकलेल्या काजू  भाजून खाऊ शकतो. कोकणात  सध्या   काजू लागवडीस अनुकूल हवामान व जमीन तसेच बाजारात जास्त भाव मिळत आहे. म्हणून कोकणातला शेतकरी काजू लागवडीकडे जास्त आकर्षित झाला आहे. काजूच्या चांगल्या वाढीसाठी व अधिक  स्वच्छ  सूर्यप्रकाशाची गरज असते.  

गुहाघर समुद्र किनारा

Image
गुहाघर समुद्र सुंदर निसर्गाने व्यापलेला आहे.सर्वात जास्त आनंद आणि खुली हवा हि फक्त आपल्याला समुद्रावर भेटते. समुद्रावर फिरण्याची खरी मजा ही संध्याकाळची असते. कारण संध्याकाळी सूर्य मावलतांना तो लाला भडक रंगाचा दिसतो. काही लोक तर खूप लांबचा प्रवास करून समुद्र पाहण्यासाठी येतात.समुद्रावरती मोकळी हवा लाटांची सळसळ  शांत वातावरण आणि समुद्राच्या किनारी बसून नारळ पाणी पियाला खूप मस्त वाटत . समुद्राच्या रेतीवर किल्ले बनवणे रेतीमध्ये वेगवेगळ्या कलाकृती करणे. तसेच समुद्रावर जाऊन फोटोशूट करणे खूप लोकप्रिय आहे.अशाप्रकारे मी समुद्रावर मजा केली होती    

मे महिन्याची सुट्टी आम्ही अशी आनंदाने घालवायचो

Image
वार्षिक परीक्षा संपली कि आम्ही वाट पाहतच असतो कि कधी सुट्टी पडतेय आणि आम्ही गावी जातोय. आणि ऊन्हाळा  चालू झाला कि गर्मी पण खूप वाढते. परीक्षा संपल्या कि सर्व लोक मे महिन्यामध्ये सुट्ट्टीचा आनंद घेण्यासाठी गावी जातात. तसेच गावी गेलो खूप आंबे ,करवंद ,जांभूळ, काजू  खायला भेटतात. तसेच मे महिन्यामध्ये विविध प्रकारचे खेळ खेळायला भेटतात. गावाकडे  गेलो कि दररोज क्रिकेट खेळायला भेटायच. दुसऱ्या गावांसोबत आम्ही मैच लावायचो.तसेच गावाकडे लपाशपी,लगोरशी,विटीदांडू,चोर पोलीस आणि रात्री बारा एक वाजेपर्यंत पत्ते खेळायचो.गावाला गेल्यावर खूप मजा करायचो. त्यात गावी गेल्यावर समुद्रावर जात असें संध्याकाळी सूर्य मावळताना बगण्याची मजा वेगळीच असते तो लाल रंगाचा सूर्य  हळूहळू केव्हा खाली डुबतो तेच समजत नाही.मग रात्र होते मग सगळे घरी जातात. मग परत  दुसऱ्या दिवशी सूर्य पूर्वेकडून उगवतो.मग मे महिन्याच्या सुट्टीत दिवस कधी निगुन जातात  समजतच नाही. गावी गेल्यानंतर आम्ही सर्वजण आंबे आणायला जंगला मध्ये जायचो. आंब झाडावर पिकलेला दिसला कि आम्ही  दगडी मारून पाडायचो.त्यामध्ये पण एक वेगळीच पद्धत असायची.जो पहिला आंबा

Shimga Festival 2020||कोकणातील शिमगा ,होळी ,पालखी नाचवणे

Image
  होळी हा सण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात साजरा केला जातो . महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात साजरा करण्याची पद्धत आहे. कोकणातली होळी एक दोन दिवसाची नव्हे तर संपूर्ण आठवडाभर असते.  कोकणामध्ये शिमगा चालू झाला कि कोकण आणि गोवा या भागात सांस्कृतिक सोहळे रंगतात. संकासुर यांचं आगमन होत. गावाला प्रत्येकाच्या घरी संकासुर येतो. काही संकासुर त्यांच्या आजूबाजूच्या गावात जाऊन आपली संस्कृती दाखवतात. तिकडे जाऊन नाचतात. आपली पापरंपारिक   संस्कृती टिकवून ठेवतात.गावाच्या देवळा मध्ये पालखी सजवली जाते. गावातील सर्व लोक तिथे उपस्थित असतात . पालखी सजवून झाली का तिची पूजा करतात. मग तिला नाचवत गावामध्ये आणली जाते. गावामध्ये आणल्या नंतर पालखीला नाचवल जात मग पालखी प्रत्येकाच्या घरी घेऊन जातात तिची पूजा करतात.             कोकणात होळी काही ठिकाणी होळीच्या रात्री होळी जाळली जाते तर काही ठिकाणी सकाळी जाळी जाते. होळी जाळ्याच्या आधी होळीच्या गोल  पालखी नाचवली जाते. नंतर मग होळीला आग लावली जाते . मग काही लोक  होळीमध्ये  नारळ टाकतात. होळीभोवती फेऱ्या मारत बोंबा मारल्या जातात  अशा प्रकारे कोकणामध्ये

हिरवगार डोंगरातून वाहणारे कोकणचे धबधबे

Image
कोकणातील  हिरवेगार डोंगर आणि त्या डोंगरांमधून वाहणारे सुंदर  धबधबे  कोकणातील पावसामुळे कोकणचं सौंदर्य आणखीन खुलून दिसत.  कोकणामध्ये पाऊस पडायला लागला कि पावसाळी पर्यटना साठी लोकांची गर्दी कोकणात होते. कोकणामध्ये  एवढे धबधबे  आहेत कि सांगताच येत नाही. मी गावी असताना पाहिलेला छोटासा दाट हिरवगार जंगलातून वाहणारा धबधब्याचे  सौंदर्य पाहून माझ मन आनंददायी झाल.    पावसाळ्यात धबधबा लांबून पहिला तर असं वाटत कि दोन डोंगरण मधून दूध पडतय.  कारण त्याचा रंग एवढा पांढरा असतो कि लांबून पाहिल्यावर वाटत दूधच पडतय.  धबधब्यांमध्ये भिजण्याचा त्यात अंगोळ करण्याची माझ्या वेगळीच असते. हेच छोटे  छोटे  धबधबे मिळून एक मोठी नदी तयार होते.  काही धबधबे एवढे मोठे आहेत त्यांना बगण्याचा आनंद आपण लांबूनच घेऊ शकतो . आपण धबधब्याच्या  बाजूला असलो कि तिथून घरी जायच मनच होत नाही. असा होता मी पाहिलेला धबधबा. 

कोकणातील करवंद

Image
एप्रिल मे महिना चालू झाला कि करवंद पिकायला सुरवात होते. जेव्हा करवंद कच्चे असतात तेव्हा आपण त्यांच्यापासून चटणी बनवू शकतो. जेव्हा करवंद कच्चे असतात तेव्हा त्यांचा रंग हिरवा असतो. आणि पिकल्यावर त्यांचा रंग काळा होतो. पिकलेली करवंद खायला एवढी गोड असतात कि तुम्ही पोटभर खात बसाल. आणि काही करवंद आंबट सुद्धा असतात. आम्ही करवंद आणायला जंगला मध्ये जायचो तेव्हा करवंद काढायचो तेव्हा हातांना काटे लागायचे. ते संपूर्ण झाड काटेरी असायच म्हणून करवंद काढताना थोडी काळजी  घ्यावी. पिकलेल्या  करवंदना चांगल सुकवून आपण त्यांना खाऊ शकतो. आणि आपण सुकवलेली करवंद दोन तीन महिने खराब होत नाही.कोकणामध्ये एप्रिल आणि मे हा करवंदांचा हंगामा आहे. कोकणामध्ये करवंद खूप पाहायला मिळतात.           

गावाकडची शेती

Image
पावसाळा ऋतू  चालू झाला कि कोकणामध्ये  शेती करायला सुरवात होते.जुन महिन्यात पाऊस पडायला सुरवात झाली कि शेतकरी पेरणी करायला सुरवात करतो. ते झालं कि दोन तीन आठवड्या नंतर भात लावणी ला सुरवात होते. त्या आधी शेतकरी शेतामध्ये नांगर धरतो. नंतर भात लावणीला सुरवात होते. आणि कोकणामध्ये शेतीची लागवड खूप केली जाते. कोकणातला शेतकरी संपूर्ण पणे शेतीवर अवलंबुन असतो. कोकणामध्ये  वेगवेगळ्या प्रकारची शेती केली जाते. कोकणमधला प्रत्येक माणूस शेती करतो.             मानवी  जीवनात  शेतीचा खूप मोठा वाटा आहे.  आणि आपल जीवन संपूर्ण पणे  शेतीवर अवलंबून आहे.  शेतीमध्ये पण विविध प्रकारची कामे असतात. उदा ..नांगरणी ,पेरणी ,कापणी ,लावणी ,रगडनी (मळणी   अशाप्रकारे कोकणामध्ये शेती केली जाते . 

कोकणातील गणेशोउत्सव

Image
गणेशोउत्सव हा सण  दरवर्षी प्रमाणे कोकणात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये  साजरा केला जातो. गणपती हा सण जवळ आला कि मुंबई मधून खूप लोक गावाकडे जातात कारण कोकणामध्ये प्रत्येकाच्या घरी गणपती आणला जातो . प्रत्येक जण आपल्या गणपती साठी वेगवेगळी सजावट करतो. प्रत्येकाच्या  देवघरात मंडपी बांधण्याची पद्धत आहे. मंडपी म्हणजे  गणपती बाप्पाच्या डोईवरचं छत. तेरडा, सुपारी, हिरणीची फुलं,दुर्वा   त्या काळात उपलब्ध असलेल्या निर्सगातल्या सुंदर  सौंदर्याने बाप्पालाही सजवलं जातं .   .गणपती घरी आला कि त्याची पूजा केली जाते.पूजा करून झाल्यावर मग आम्ही सर्वजण आरती बोलतो . त्यानंतर संध्याकाळी आम्ही सर्वजण प्रत्येकाच्या घरी जाऊन आरती  बोलायला जायचो.प्रत्येकाच्या घरी जाऊन नाचायचो. असा आहे कोकणातला गणेश उत्सव.    त्यानंतर आतुरता असते ती  गौरी  आगमन आणि पूजनाची.  गौरी  आल्यानंतर दोन दिवस कसे निघून जातात तेच समजत नाही.त्यानंतर  गौरी साठी खास  नैवेद्य. भाज्या ,भाकरी ,भात ,खीर ,मोदक या सगळ्याची  चव  त्या दिवशी वेगळीच लागते. अशाप्रकारे दिवस कधी  निघून जातात तेच समजत नाही. कोकणामध्ये गणेशउत्सव साजरा क

कोकणातला हापूस आंबा

Image
कोकणामध्ये हापूस आंबा म्हटल कि एप्रिल ते जुन हा या फळांचा हंगाम आहे. आंबा हा भारताचा राष्ट्रीय फळ आहे. आणि कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात आंब्यांची  लागवड केली जाते.मे महिना चालू झाला  कि लोक गावी जातात आंबे खाण्यासाठी  गावाला जातात. गावाकडे विविध प्रकारचे आंबे असतात त्यांची नाव पण वेगळीच असतात. उदा  बिटकी ,ढेपा आंबा,आमटोरा  आंबा,      जेव्हा आम्ही आंबे काडायला जायचो तेव्हा माझा एक मित्र आंबे काढण्यासाठी झाडावर चढायचा आणि मी खाली  आंबे झेलायचो. नंतर ते आंबे घरी आणून पिकण्या साठी टोपली मध्ये ठेवायचो. दोन आठवडे  झाले कि हळूहळू आंबे पिकायला लागायचे मग आम्ही आंब्याचं रस करायचो. आंबे कितीपण खावा त्याचा शरीरावर काहीच परिणाम  होत नाही. आणि आंबा हा एवढा गोड आहे कि  तुम्हाला सारखा सारखा खावासा वाटतो. म्हणून कोकणातला आंबा हा लोकप्रिय आहे .         

कोकणातले फणस

Image
साधारण एप्रिल मार्च महिना चालू झाला कि कोकणामध्ये  फणस लागायला लागतात. नंतर फणस पिकायला लागतात.कच्या  फणसापासून  कोकणामध्ये  भाजी केली जाते. आणि ती फणसाची भाजी खूप लोकप्रिय आहे.  फणसामध्ये पण दोन प्रकार असतात. एक बरखा फणस आणि एक कापा फणस पण जो कापा फणस असतो खायला खूप मस्त वाटतो. आणि कोकणामध्ये फणसाची लागवड खूप होते. आणि आपण जेव्हा पिकलेला फणस खातो त्यावेळी आपल्याला हातांना तेल लावून घ्यावे. त्यामुळे आपल्याला फणसाचा चिक लागत नाही.  अशा प्रकारे  कोकणातला फणस लोकप्रिय आहे      

माझ गाव

Image
                                             गाव म्हटल कि गावाकडली आठवण कुणाला येत नाही सर्वांनाच येते  माझ्या आठवणीतल गाव म्हणजे गुहागर तालुक्यतल गोणवली गाव .   गावाच्या चारही बाजूने निसर्गरम्य हिरवंगार डोगंर त्यात मध्ये वसलेले छोटस आमच गाव . गावाच्या मध्य भागी एक गणपतीच मंदिर आहे. त्या मंदिरा मध्ये दरवर्षी प्रमाणे सण साजरे केले जातात .   गावामध्ये  चांगली लोक , चांगली संस्कृती आहे .  गावाकडली सर्वांची घरे   कौलारू  प्रत्येकाची  भात  शेती प्रत्येकाच्या घरासमोर  नारळाच्या बागा त्यामुळे  गावातल निसर्गरम्य  त्यात हिरवेगार डोगंर  वाकडया  तिकड्या पाय वाटा. तसेच गावाकडे आंबे  ,फणस ,काजू करवंदे ,जांभूळ  पाहायला मिळते. गावामधून शांत वाहणारी नदी असं होत माझ्या स्वप्नातल गाव