गावाकडची शेती
पावसाळा ऋतू चालू झाला कि कोकणामध्ये शेती करायला सुरवात होते.जुन महिन्यात पाऊस पडायला सुरवात झाली कि शेतकरी पेरणी करायला सुरवात करतो. ते झालं कि दोन तीन आठवड्या नंतर भात लावणी ला सुरवात होते. त्या आधी शेतकरी शेतामध्ये नांगर धरतो. नंतर भात लावणीला सुरवात होते. आणि कोकणामध्ये शेतीची लागवड खूप केली जाते. कोकणातला शेतकरी संपूर्ण पणे शेतीवर अवलंबुन असतो. कोकणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शेती केली जाते. कोकणमधला प्रत्येक माणूस शेती करतो.
मानवी जीवनात शेतीचा खूप मोठा वाटा आहे. आणि आपल जीवन संपूर्ण पणे शेतीवर अवलंबून आहे. शेतीमध्ये पण विविध प्रकारची कामे असतात. उदा ..नांगरणी ,पेरणी ,कापणी ,लावणी ,रगडनी (मळणी अशाप्रकारे कोकणामध्ये शेती केली जाते .
Comments
Post a Comment