मे महिन्याची सुट्टी आम्ही अशी आनंदाने घालवायचो
वार्षिक परीक्षा संपली कि आम्ही वाट पाहतच असतो कि कधी सुट्टी पडतेय आणि आम्ही गावी जातोय. आणि ऊन्हाळा चालू झाला कि गर्मी पण खूप वाढते. परीक्षा संपल्या कि सर्व लोक मे महिन्यामध्ये सुट्ट्टीचा आनंद घेण्यासाठी गावी जातात. तसेच गावी गेलो खूप आंबे ,करवंद ,जांभूळ, काजू खायला भेटतात. तसेच मे महिन्यामध्ये विविध प्रकारचे खेळ खेळायला भेटतात. गावाकडे गेलो कि दररोज क्रिकेट खेळायला भेटायच. दुसऱ्या गावांसोबत आम्ही मैच लावायचो.तसेच गावाकडे लपाशपी,लगोरशी,विटीदांडू,चोर पोलीस आणि रात्री बारा एक वाजेपर्यंत पत्ते खेळायचो.गावाला गेल्यावर खूप मजा करायचो. त्यात गावी गेल्यावर समुद्रावर जात असें संध्याकाळी सूर्य मावळताना बगण्याची मजा वेगळीच असते तो लाल रंगाचा सूर्य हळूहळू केव्हा खाली डुबतो तेच समजत नाही.मग रात्र होते मग सगळे घरी जातात. मग परत दुसऱ्या दिवशी सूर्य पूर्वेकडून उगवतो.मग मे महिन्याच्या सुट्टीत दिवस कधी निगुन जातात समजतच नाही. गावी गेल्यानंतर आम्ही सर्वजण आंबे आणायला जंगला मध्ये जायचो. आंब झाडावर पिकलेला दिसला कि आम्ही दगडी मारून पाडायचो.त्यामध्ये पण एक वेगळीच पद्धत असायची.जो पहिला आंबा